dr shankar dayal sharma information in marathi
![]() |
dr shankar dayal sharma information in marathi |
You can get all information in marathi
![]() |
dr shankar dayal sharma information in marathi |
![]() |
dr-sarvepalli-radhakrishnan-information-in-marathi |
![]() |
dr-manmohan-singh-information-in-marathi |
![]() |
Chandra-Shekhar-information-in-marathi |
![]() |
babu-rajendra-prasad-information-in-marathi |
अटलबिहारी वाजपेयी हे एकदा, दोनदा नव्हे तर तीनवेळा आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत. तरुण वयापासून आज ७५ व्या वर्षापर्यंत लोकप्रियता लाभलेले ते एकमेव नेते आहेत. देशाच्या राजकारणात अटलजी फार प्रदीर्घकाळ आहेत. कसलेले संसदपट निष्कलंक चारित्र्य असलेला राजकीय नेता, लोकांच्या हृदयाला हात घालणारा कवी, प्रतिभावंत वक्तृत्त्वपट्र असे हे लोकप्रिय नेते आहेत. गेली ४० वर्षे ते संसदेत कार्य करीत आहेत. ते तरुण खासदार होते, तेव्हाच पंडित नेहरूंनी त्यांच्यातील नेतेपणाचे गुण हेरले होते व एक दिवस अटलजी पंतप्रधान होतील असेही सांगितले होते ते उद्गार आता खरे ठरलेले दिसत आहेत.
अटलजींचा जन्म २५ डिसेंबर १९२६ या दिवशी ग्वाल्हेर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नांव कृष्णबिहारी आणि आईचे नांव कृष्णादेवी. अटलजींचे प्रारंभीचे शिक्षण गोरखी विद्यालयात झाले. त्यानंतर ते व्हिक्टोरिया कॉलेजमधून बी. ए. झाले. शिक्षण चाल असतानाच अटलजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला लागले. १९४२ सालच्या लढ्यात भाग घेऊन त्यांनी आपल्या राजकीय कार्याची सुरूवात केली. १९४७ ते १९५२ पर्यंत पांचजन्य', 'स्वदेश', 'वीर अर्जुन ' या नियतकालिकांचे संपादक म्हणून काम केले.
atal-bihari-vajpayee-information-in-marathi
१९५१ मध्ये अटलजी भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य होते. १९५७ मध्ये ते बलरामपूर येथून लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाले. जनसंघाचे राष्ट्रीय चिटणीस, विरोधी पक्षनेता, जनता पार्टीचे संस्थापक सदस्य, परराष्ट्रमंत्री, भा. ज. पा. चे संस्थापक अशा विविध नात्यांनी ते राजकारणात वावरत आहेत. १९७५ साली हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवली. तेव्हा इंदिराजींनी आणीबाणी पुकारली. त्याकाळी इतर नेत्यांबरोबर अटलजींनाही अटक झाली होती. आणीबाणी उठवल्यावर १९७७ साली निवडणुका घेण्यात आल्या त्यात जनता पक्ष जिंकून आला.
त्यांच्या सरकारमध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री बनले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी चीन व पाकिस्तानबरोबरचे भारताचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. १९९८ मध्ये भा. ज. प. आणि मित्र पक्षांचे सरकार स्थापन झाले त्यावेळी अटलबिहारी यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग खडतर होता. ओरीसाच्या किनाऱ्यावरचे तुफान वादळ, गुजरातेत भयानक भूकंप, अनेक राज्यांमध्ये दुष्काळ अशा अनेक आपत्तींना वाजपेयी सरकारला तोंड द्यावे लागले आहे. या नैसर्गिक आपत्तींप्रमाणेच इतरही आपत्ती त्यांच्यावर कोसळल्या.
पोखरणच्या अणुस्फोटानंतर विरोधी पक्ष आणि अमेरीका यांनी टीकेची झोड उठविली. अशावेळी वाजपेयींनी सारी परिस्थिती खंबीरपणे हाताळली आणि अमेरिकेच्या कठोर धोरणात बदल घडवून आणले. शेजारी पाकिस्तानबरोबरचे वैर विसरून मैत्री संपादन करण्यासाठी पुढाकार घेतला. लाहोरसाठी बस सुरू केली. परंतु नवाझ शरीफ यांनी कपटाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. कारगिलच्या युद्धानंतर पुनः वाजपेयींनी आपल्या धोरणाचा नव्याने विचार केला व दोन्ही देशात व्यापार खुला केला. त्यामुळे पाकिस्तानात भारताला अनुकूल वातावरण तयार होत आहे.
वाजपेयींनी आपली अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली केली आणि तिचे फायदे थोड्याच वेळात आपल्या पदरात पडू लागले. पाहता पाहता भारत जगातील एक औद्योगिक महासत्ता होऊ लागली आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक वेगाने विकसित व्हावी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर तिचा प्रभाव पडावा या गोष्टीला वाजपेयी यांनी आपल्या धोरणांनी फार मोठा हातभार लावला आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला असे वेगळे, उदार व समावेशक वळण देणे, हे वाजपेयींचे भारताला फारमोठे योगदान आहे. त्यामुळे भारताच्या इतिहासात एक द्रष्टा व भारताचा हितकर्ता पंतप्रधान म्हणून त्यांचे नांव कायमचे कोरले जाईल.
अटलबिहारी यांनी पंतप्रधानकीच्या कारकीर्दीत अपूर्व काम केले आहे. आर्थिक, परराष्ट्रव्यवहार, मूलभूत सोयी, सुविधा, संरक्षण आदि क्षेत्रात त्यांच्या सरकारने फार मोठी कामगिरी केली आहे. अटलजी जसे ओजस्वी नेता आहेत, तसेच ते कोमल कवीही आहेत. वडिलांकडून त्यांना काव्याचा वारसा मिळाला आहे. भावुक मनाचा कवी म्हणून त्यांचे स्थान उच्च कोटीचे आहे. जनतेची दुःखे पाहून ते व्यथित होतात आणि कैदी कविराम की कुंडलियाँ 'अमर आग है ' असे सुंदर काव्यसंग्रह निर्माण होतात. त्यांच्या कविता पद्मजा फेणाणी यांनी गाऊन स्वरबद्ध केल्या आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.
रा. लो. आ. च्या मदतीने वाजपेयीनी देशाच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने पावले उचलली. दूरदृष्टी हा त्यांचा स्थायीभाव आहे. पोखरण येथे त्यांनी घडवून आणलेली अणुबाँबची चाचणी हा सर्व जगाला आश्चर्याचा धक्का होता. पण वैज्ञानिकांचे ज्ञान, त्यांनी जगापुढे ठेवले आणि ' हम भी कुछ कम नही ' हे दाखवून दिले. भारताला बलशाली राष्ट्र बनविण्याच्यादृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. अटलजींचा जीवनप्रवाह चारी अंगांनी फुलणारा आहे. १९९४ साली त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला. तत्पूर्वी १९९२ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
एकंदरीत पाहता गेली अनेक वर्षे भारताला एक विचित्र गतिशून्यता आली होती. पण अटलजींच्या नेतृत्त्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेने जुनी कात टाकून देऊन नवे चैतन्यदायी रूप धारण केले आहे. १९९१ मध्ये आपली अर्थव्यवस्था कंगाल झाली होती. आता लक्षावधी डॉलर्सचे परकीय चलन भारताच्या गंगाजळीत जमले आहे. अन्नधान्याच्या उत्पादनाने विक्रमी बावीस कोटी टनांचे लक्ष्य गाठले आहे. रस्ते, पूल बांधले जात आहेत. भाववाढ लक्षणीय प्रमाणात घटली आहे. अनेक संकटांशी झुंज देण्यास भारत समर्थ ठरला आहे. परराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रातही अटलजींनी नवे विक्रम करुन दाखविले आहेत. अण्वस्त्रनिर्मिती करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. अटलजींच्या सरकारने सर्वशिक्षा अभियान चालू केले आहे, त्यामुळे खेड्यापाड्यातील गरीबांची मुलेही सुशिक्षित होतील.
अशा त-हेने अटलजींच्या रूपाने देशाला चारित्र्यसंपन्न, त्यागी, राज्यसभेची जाण असलेला, विविध विषयांचा सखोल अभ्यास असणारा, अद्वितीय वक्तृत्त्व असलेला असा नेता लाभला होता.
ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती आहेत. ते भारताला लाभलेले सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे, एकमेवाद्वितीय असे वैज्ञानिक आहेत. अत्यंत गुंतागुंतीचे तंत्रज्ञान भारतात विकसित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. 'टेक्नॉलॉजी इन्फर्मेशन फोरकास्टिंग अँड अॅसेसमेंट कौन्सिल ' या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने भारतातल्या अनेक आधुनिक तांत्रिक प्रकल्पांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि भारताला २१ व्या शतकात घेऊन जाण्यासाठी आवश्यक अशा मोहिमा त्यांनी आखल्या.
![]() |
dr-apj-abdul-kalam-information-in-marathi |
'इस्त्रो' आणि 'डि. आर. डी. ओ. ' या महत्वाच्या वैज्ञानिक संस्थांमध्ये डॉ. कलाम यांनी उच्चपदे भूषविली आहेत. काही व्यक्तिमत्त्वेच लोकोत्तर असतात. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे असेच एक व्यक्तिमत्त्व होय. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी मद्रास राज्यातील रामेश्वरम् या छोट्या बेटासारख्या गावात अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नांव जैनलबदीन. हेमध्यमवर्गीय तमिळ नावाडी होते. ते व आई आशियम्मा यांच्याजवळ उदार, विशाल दृष्टीकोण होता. दोघेही सदैव दुसऱ्यांना मदत करण्यात तत्पर असत.
त्यांचे संस्कार घेऊनच कलाम लहानाचे मोठे झाले. वडिलांचा लाकडी नौका बांधायचा व्यवसाय होता. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यावर पढील शिक्षणासाठी कलाम रामनाथपुरम्ला आले. त्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. येथेच त्यांना इंग्लिश साहित्याची गोडी लागली. टॉलस्टॉय, हार्डी, स्कॉट अशा जगप्रसिद्ध लेखकांचे साहित्य त्यांनी वाचून काढले. बी. एस्. सी. नंतर 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ' मध्ये इंजिनिअरिंग शाखेसाठी प्रवेश घेतला.
येथील शिक्षण संपल्यावर ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड' या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून आले. तेथे विमानांची देखभाल करण्याच्या कामात त्यांनी प्राविण्य मिळवले. एरोनॉटिकल अभियंता बनून त्यांनी आपल्या आकाशात विहार करण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणले. शिक्षण संपल्यावर ते संरक्षण खात्याच्या विशेष विभागात काम करू लागले. ( १९५८ ) येथे त्यांनी 'नंदी' नावाचे हॉवरक्राफ्ट बनवले.
त्यानंतरच्या काळात त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेत काम करायला सुरुवात केली. १९६२ मध्ये धुंबा या केरळमधील गावी अवकाशतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे काम करीत असतानाच कलाम यांना 'नासा' या अमेरिकेतील संस्थेत अवकाशयान उड्डाणाच्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी पाठविण्यात आले. हे शिक्षण पूर्ण करून कलाम परतले, आणि नोव्हेंबर १९६३ मध्ये नाइके अपाची ' हे धुंबा येथे जुळणी केलेले पहिले अंतराळयान अवकाशात सोडण्यात आले व ते यशस्वीरीत्या कार्य करू लागले.
यानंतर 'रोहिणी साऊडिंग रॉकेट ' हे पृथ्वीजवळच्या वातावरणाचा अभ्यास करणारे यान पाठवण्यात आले. या दोन्ही ठिकाणी कलाम यांच्या देखरेखीखाली काम करण्यात आले. अशा त-हेने अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात झपाट्याने विकास चालू झाला. धुंबा येथे कलाम यांनी विविध स्तरांवर काम केले व यश मिळवले. उदा. रॉकेटस् तयार करणे, त्यांची क्षमता तपासणे, रॉकेटस्च्या उड्डाणासाठी सहाय्यक ठरणारी यंत्रे बनवणे वगैरे.
यापुढच्या काळात लहान धावपट्टीवर विमाने उडविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रकल्प ( राटो) कलाम यांच्यावर सोपवण्यात आला. यापुढची पायरी म्हणजे भारताच्या संरक्षणखात्याने स्वतंत्रपणे क्षेपणास्त्रे बनवण्याचे ठरविले. हा प्रकल्पही कलाम यांच्या ग्रुपने १६ महिन्यात पूर्णत्वाला नेला. स्वदेशी बनावटीचा उपग्रह तयार करून अवकाशांत सोडायचा, ही पुढली पायरी होती. त्यासाठी श्रीहरीकोटा हे मद्रासजवळचे बेट ठरविण्यात आले.
१९६८ मध्ये इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन ( इस्त्रो) ही संस्था अवकाश संशोधनाची धुरा वाहू लागली. इस्त्रोचा प्रमुख म्हणून अब्दुल कलाम यांची निवड झाली. 'राटो' सिस्टिम १९७२ मध्ये बरेली येथे हवाई दलाच्या केंद्रावर प्रत्यक्षात वापरली गेली आणि परकीय चलन वाचवल्याबद्दल कलाम यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. विक्रम साराभाई स्पेस सेंटरवर एस्. एल्. व्ही ३ च्या कामाला वेग आला आणि हा ही प्रकल्प सुसूत्रपणे पार पाडण्यासाठी कलाम यांच्या हाती सोपविण्यात आला. या प्रकल्पातील अनेक यंत्रणा देशी माल वापरून व स्वदेशी तंत्रज्ञान वापरून बनविण्यात आल्या.
१८ जुलै १९८० ला श्रीहरीकोटाच्या अवकाश तळावरुन रोहिणी उपग्रह यशस्वीपणे सोडण्यात आला आणि उपग्रह अवतरणाची व्यवस्था असलेल्या काही मोजक्या देशांच्या पंगतीत भारताने स्थान मिळवले. देशाच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरवात झाली. यातून पुढे 'अग्नी' ची निर्मिती झाली. 'इस्त्रो'मध्ये १८ वर्षे काम केल्यानंतर कलाम यांनी डी. आर. डी. एल्. ची जबाबदारी घेतली.
१९८१ साली त्यांना 'पद्मभूषण ' या पदवीने सन्मानित करण्यात आले. १९९० मध्ये ‘पद्मविभूषण' ही पदवी देण्यात आली. त्यानंतर १९९७ मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च पदवीने त्यांचा सन्मान केला गेला. देशातील ३० विद्यापीठांकडून 'डॉक्टरेट ' मिळवलेले ते एकमेव गृहस्थ आहेत. १९८२ मध्ये अब्दुल कलाम ‘संरक्षण संशोधन आणि विकास ' संस्थेमध्ये काम करू लागले. आपल्याला दुसऱ्या देशांनी जे तंत्रज्ञान देण्याचे नाकारले, ते तंत्रज्ञान शून्यातून विकसित करण्याचे महत्वाचे काम या ठिकाणी करण्यात आले.
नोव्हेंबर १९९९ मध्ये भारत सरकारचा ‘प्रधान तंत्र सल्लागार ' म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. सामाजिक गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि राष्ट्रासमोर एका नव्या दृष्टिकोनाची उभारणी करणे असे कार्य कलाम यांनी या काळात केले. 'अग्नि', 'आकाश', 'नाग', 'पृथ्वी ', ' त्रिशूल ' या क्षेपणास्त्रांचे अब्दुल कलाम हे सर्वेसर्वा आहेत.
तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी 'अग्निपंख ' हे आत्मचरित्र प्रज्वलित भने', 'इंडिया २०२० - ए व्हिजन फॉर मिलेनियम ' अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यायोगे भारत हा एक विकसनशील देश न राहता त्याचे रूपांतर एका विकसित देशात व्हावे हा त्यांचा प्रयत्न आहे. २५ जुलै २००२ ' पासून ते राष्ट्रपती झाले. आपल्या देशातील नागरिकांकडे ताकद आहे आणि त्या ताकदीला कठोर परिश्रमांची जोड देऊन आपल्या सोनेरी युगाची स्वप्ने साकार करता यायला हवीत.
राजकारणाला छेद देऊन नव्या पिढीला प्रगतीचा मार्ग दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी देशवासियांच्या आत्मविश्वासाला आणि अंतस्थ प्रेरणेला ते साद घालतात. अनेक शाळांना भेटी देऊन त्यांनी हजारो मुलांबरोबर संवाद साधला आहे. मुलांच्या मनात विज्ञानाबद्दल प्रेम, आस्था निर्माण केली आहे. यायोगे भारताला एक विकसित देश म्हणून जगापुढे आणण्याची मोहिम त्यांनी आखलेली आहे. त्यांच्या स्वप्नाची पूर्ती व्हावी म्हणून आपल्या लाख लाख शुभेच्छा !!
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा कार्यकाल २४ जुलै २००७ रोजी संपला.
![]() |
pandit-jawaharlal-nehru-information-in-marathi |
![]() |
morarji-desai-information-in-marathi |
![]() |
gulzarilal-nanda-information-in-marathi |